किसानपुत्र करतील अन्नत्याग आंदोलन
मांजरी खुर्द - शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणचे किसानपुत्र 19 मार्च रोजी एक दिवस उपोषण करुन अन्नदात्यासाठी राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी त्याबाबत माहिती दिली. 19 मार्च 1986 रोजी चिल-गव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटूंबाने पवनारला जाऊन आत्महत्या केली होती. ही दारुण घटना शेतकऱयांची पहिली आत्महत्या मानली जाते.
मांजरी खुर्द - शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणचे किसानपुत्र 19 मार्च रोजी एक दिवस उपोषण करुन अन्नदात्यासाठी राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी त्याबाबत माहिती दिली. 19 मार्च 1986 रोजी चिल-गव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे व त्यांच्या संपूर्ण कुटूंबाने पवनारला जाऊन आत्महत्या केली होती. ही दारुण घटना शेतकऱयांची पहिली आत्महत्या मानली जाते.
32 वर्षांपूर्वी झालेल्या या आत्महत्येनंतर सातत्याने शेतकऱयांच्या आत्महत्या होत आहेत. गेल्यावर्षी याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील नागरिकांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. या वर्षीही हजाराहून अधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा ह्या वर्षीही 19 मार्चला हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची माहिती देताना अमर हबीब म्हणाले की, 'हे कुठल्या एका संघटनेचे आंदोलन नाही. आपल्या अवतीभोवती रोज आत्महत्या होताना आपण काय करु शकतो? आपण किमान सहवेदना व्यक्त करायला पाहिजे. याला उपवास म्हणा, उपोषण म्हणा वा अन्नत्याग म्हणा. आपण व्यक्तिगत करु शकता. तुमच्या संघटनेच्या नावाने करु शकता. कामावर असताना करु शकता, हवे तर एके ठिकाणी बसून करु शकता. सुजाण नागरिकांनी विशेषतः शहरात गेलेल्या किसानपुत्र व पुत्रीनी यात हिरीरीने भाग घ्यावा, असे मी त्यांना आवाहन करतो.' शेतकऱयांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे (सिलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण) आहेत. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहितीही अमर हबीब यांनी दिली. 'मी यंदा पवनार येथे प्रशांत हमदापुरकर, अभिजित फाळके, किशोर माथनकर, अॅड. दिनेश शर्मा, ज्ञानेश वाकुडकर आदी मित्रांच्या सोबत उपोषण करणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.